शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

चंद्रकांतदादांनी पुढाकार घेतल्यास कोंडी फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:34 IST

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतल्यास उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटू शकतो. कारखानदार व संघटना प्रतिनिधी यांना एकत्र आणून त्यासाठी चर्चा सुरू करण्याची गरज आहे. आंदोलन चिघळल्यावर हे करण्यापेक्षा संवादाची प्रक्रिया सुरू होण्याची आवश्यकता आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत टनास ३४०० रुपयांची पहिली उचल मागितली आहे.संघटनेचे नेते ...

ठळक मुद्देपहिल्या उचलीचा तिढा :गतवर्षी चर्चेतून मार्ग काढला होता; संवादाची प्रक्रिया सुरू होण्याची गरजएफआरपी व टनास १७५ रुपये जादा असा तोडगा निघाला

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतल्यास उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटू शकतो. कारखानदार व संघटना प्रतिनिधी यांना एकत्र आणून त्यासाठी चर्चा सुरू करण्याची गरज आहे. आंदोलन चिघळल्यावर हे करण्यापेक्षा संवादाची प्रक्रिया सुरू होण्याची आवश्यकता आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत टनास ३४०० रुपयांची पहिली उचल मागितली आहे.

संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मागणीमध्ये पुढेमागे व्हायला तयार असल्याचे जाहीर केले आहे; परंतु या प्रश्नात कारखानदार व संघटना प्रतिनिधी यांना एकत्र आणायचे कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी संघटनेने एकरकमी ३२०० रुपयांची मागणी केल्यावर पालकमंत्री पाटील यांनीच पुढाकार घेतला व चर्चा घडवून आणली. त्यामध्ये एफआरपी व टनास १७५ रुपये जादा असा तोडगा निघाला. यंदाच्या ऊस परिषदेत शेट्टी यांनी मुख्यत: भाजपावर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच सडकून टीका केली आहे.

त्यामुळे शेट्टी व भाजपा यांच्यामधील दरी वाढली आहे. हे जरी खरे असले तरी जिल्ह्णातील लाखो शेतकºयांच्या जीवनमरणाशी संबंधित प्रश्न म्हणून पालकमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची गरज आहे. दादांनी बैठक घेऊन काही तोडगा काढला तर तो सर्वमान्य होऊ शकतो. प्रतिवर्षी हा आंदोलनाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सरकारने एफआरपी व सी. रंगराजन समितीने ७०:३० चा फॉर्म्युला निश्चित करून दिला. त्यानुसार शेतकºयांना बिल न देणाºया कारखान्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. असे असताना पुन्हा शेतकºयांनी व संघटनांनीही नफ्यातील रक्कम आधीच द्या, असा आग्रह धरणे चुकीचे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना याबाबत थेट मध्यस्थी करण्यास अडचणी आल्या आहेत.पुण्यातील बैठकीबाबत संभ्रमकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुण्यात गुरुवारी (दि. २) याच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलविली आहे; परंतु आजअखेर तरी त्याबाबत कारखानदार अथवा संबंधित घटकांना त्याची कोणतीही माहिती नाही. खोत आणि स्वाभिमानी संघटना यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी श्रेय घ्यायचे म्हणून घाईगडबडीत काही तोडगा काढल्यास त्यातून प्रश्न चिघळला जाऊ शकतो.दोन दिवसांत निर्णयचंद्रकांतदादा यांच्या हस्ते आज, मंगळवारी पंढरपूरमध्ये विठ्ठलाची पूजा आहे. त्यानंतर कदाचित आज मुंबईतपाटील यांची या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा अपेक्षित आहे. त्यानंतर या घडामोडींना वेग येऊ शकतो.कोल्हापूरचा तोडगा राज्यात सर्वमान्य ऊसदराच्या प्रश्नात आतापर्यंत कोल्हापूर काय ठरवेल, तोच फॉर्म्युला राज्यभर मान्य केला गेला आहे. यंदा कारखानदारही चांगली उचल द्यायला तयार आहेत व संघटनाही फारशा ताठर नाहीत. त्यामुळे एफआरपी व २५० रुपये जादा दिल्यास उसदराचा तिढा सुटू शकतो.

टॅग्स :ministerमंत्रीStrikeसंप